Anuradha Vipat
स्वयंपाक करताना पालेभाज्यांचा गडद हिरवा रंग कायम ठेवणे हे त्यातील पोषणमूल्ये टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे असते.
काही सोप्या शेफ टिप्स वापरून तुम्ही भाज्यांचा नैसर्गिक हिरवा रंग सहज टिकवू शकता.
पालेभाजी प्रथम उकळत्या पाण्यात फक्त १ ते २ मिनिटे टाका. त्यानंतर लगेच ती बाहेर काढून बर्फाच्या थंड पाण्यात बुडवून ठेवा.
भाजी उघड्या कढईत किंवा पातेल्यात शिजवा. झाकण ठेवल्याने भाजीतील नैसर्गिक आम्ल वाफेच्या रूपाने बाहेर पडू शकत नाहीत
पालेभाजी उकळताना किंवा तेलात परताना त्यात अगदी चिमूटभर साखर टाका.
भाजी उकळताना पाण्यात अगदी नावापुरता (एक चिमूट) खाण्याचा सोडा टाकावा. यामुळे भाजीचा रंग छान हिरवागार राहतो.
भाजीमध्ये लिंबाचा रस किंवा टोमॅटो टाकायचा असल्यास, ते भाजी पूर्ण शिजून गॅस बंद केल्यानंतरच टाकावे.