sandeep Shirguppe
अनवाणी पायाने चालणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनवाणी पायाने चालल्याने शरीर चांगले राहते.
मुलांना मैदानी खेळ खेळताना पायात चप्पला घालणे टाळा. त्यामुळे मुलांच्या शरीराची वाढ होते.
अनवाणी पायाने चालल्याने पायाचे स्नायू मजबूत होतात. यामुळे शरीराचे संतुलन राहते.
जेव्हा तुम्ही अनवाणी पायाने जमिनीवर चालता तेव्हा तुमच्या पायातील सेंसरी नर्व्हस अॅक्टिव होतात.
अनवाणी पायाने चालल्याने झोपेची समस्या येत नाही. अनवाणी पायाने चालल्याने शरीर हलके आणि रिलॅक्स होते.
अनवाणी पायाने चालल्याने शरीरातील नसांवर चांगला परिणाम होतो. या नसा मेंदूपर्यंत असतात. त्यामुळे रक्तभिसरण चांगले होते.
गवतावर अनवाणी पायाने चालल्यावर पायाला मातीचा, गवताचा स्पर्श होतो. तेव्हा खूप मस्त वाटते.
गार्डनमध्ये किंवा मैदानात चालण्याची सवय करा. जर तुमच्या पायाला कोणतीही जखम असेल तर अनवाणी पायाने चालू नका.