Team Agrowon
व्हॅलेंटाइन संपल्यानंतर पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर गुलाब उत्पादक शेतकरी हे लग्नसराईच्या हंगामात फुले विक्रीला आणण्याच्या दृष्टीने तयारी करत असतात.
दरवर्षी या गुलाब शेतीतून खर्च वजा जाता १२ ते १५ लाख रुपयांची उलाढाल होते.
व्हॅलेंटाइन आणि लग्न समारंभामध्ये प्रामुख्याने लाल रंगाच्या फुलांना जास्त मागणी असते.
गुलाबाच्या मुळांना पाणी पुरविण्यासोबत पिकांच्या कॅनॉपीमध्ये आणि मुळांच्या नजील आवश्यक तो ओलावा निर्माण करून सूक्ष्म वातावरण टिकवले जाते. त्याचा पिकांच्या वाढीसाठी चांगला फायदा होतो.
सध्या लग्न समारंभाच्या हंगामासाठी गुलाब फूल उत्पादकांची लगबग सुरू झाली आहे.
देशांमध्ये गुवाहाटी, नागालँड, कोलकाता, जम्मू, दिल्ली, अहमदाबाद, सुरत, बडोदा, राजकोट, पणजी, बंगलोर, हैदरावाद, पटना, इंदूर, छत्तीसगड, अमरावती (आंध्र प्रदेश) या अन्य राज्यांसोबत राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर या बाजारपेठेमध्ये दरानुसार फुले पाठवली जातात.
सध्या २० फुलांच्या एका गुलाब गड्डीचा दर १२० ते १३० रुपयांदरम्यान आहे. म्हणजेच प्रति फूल ६ ते ७ रुपये दर मिळत आहे.
यंदा व्हॅलेंटाइनमध्ये केवळ ३० टक्के फुलांचीच निर्यात झाली आहे. परिणामी स्थानिक बाजारात फुलांची आवक जास्त आल्याने अपेक्षित दर मिळाले नाहीत. आता शेतकऱ्यांची संपूर्ण मदार ही लग्नसराईवर आहे.