Team Agrowon
बरेचदा घरी दही लावताना किंवा लावल्यानंतर ते चांगले जमत नाही. विशेषतः भांड्यात वर दही असते आणि खाली आंबट पाणी असते. हे टाळण्यासाठी आणि उत्तम दही तयार होण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते.
दूध गरम करतेवेळी हलवल्यामुळे किंवा भांड्याचा बूड पातळ असल्यास भांड्यास खाली दूध चिकटून ते जळून जळका वास येतो.
दूध पूर्णपणे न तापविल्यास.
दूध जास्त गरम किंवा थंड असताना त्यात विरजण घातल्यास.
विरजण लावलेल्या दुधास कोमट जागी न ठेवता थंड जागी ठेवल्यास. अस्वच्छ भांड्यात विरजण लावल्यास.
विरजण अयोग्य प्रमाणात लावल्यास.
विरजण जुने किंवा खराब असल्यास.