Anuradha Vipat
भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण म्हणजेच रक्षाबंधन यंदा शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे.
या वर्षी भद्रा काळ सूर्योदयापूर्वीच संपत असल्याने बहिणींना कोणत्याही अडथळ्याशिवाय संपूर्ण सकाळ शुभ मुहूर्तावर भावाच्या मनगटावर राखी बांधता येईल.
हिंदू दिनदर्शिकेनुसार, श्रावण पौर्णिमा तिथी खालीलप्रमाणे असेल
पौर्णिमा तिथी प्रारंभ: २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०९:०८ वाजता.
पौर्णिमा तिथी समाप्ती: २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०९:४८ वाजता
यंदाची विशेष बाब म्हणजे २८ ऑगस्ट रोजी भद्रा काळाचे कोणतेही सावट नाही, कारण भद्रा काळ सूर्योदयापूर्वीच समाप्त होत आहे.
२८ ऑगस्ट रोजी सकाळी १०:५४ ते दुपारी १२:०२ या वेळेत 'राहुकाळ' असेल.
शास्त्रानुसार राहुकाळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, त्यामुळे या काळात भावाला राखी बांधणे पूर्णपणे टाळावे
२८ ऑगस्ट २०२६ रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आहे; परंतु हे ग्रहण भारतातून दिसणार नाही.