Mahesh Gaikwad
देशभर सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांचे नेते प्रचारासाठी फिरत आहेत.
प्रचारासाठी मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी आदिवासी महिलांसोबत संवाद साधला आहे.
शहडोल-उमरीया रस्त्याने जात असताना राहुल गांधींनी आपला ताफा थांबवत जंगलात मोह फळे गोळा करणाऱ्या आदिवासी महिलांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी या आदिवासी महिलांसोबत फळे गोळा केली. एवढंच नाही तर या फळांची चवही चाखळी.
यावेळी राहुल गांधींनी या आदिवासी महिलांसोबत चर्चा तर केलीच पण त्यांच्यासोबत मोहाची फळेही वेचली.
आदिवासींसाठी मोहाच्या झाडाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. या झाडापासून मिळणारी फुले आणि फळे विकून ते आपली उपजीविका चालवितात.
आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीवरील हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आम्ही पूर्ण बांधिलकीने पार पाडू, असा विश्वास राहुल यांनी यावेळी दिला.