Mahesh Gaikwad
सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. या दिवसांत मुस्लिम बांधव दिवसभर उपवास करतात आणि सायंकाळी अन्न ग्रहण करतात.
उपवास सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलेले अन्न फेकून दिले जाते. त्यावर मलेशिया सरकारने नामी उपाय शोधून काढला आहे.
मलेशियातील पहांग राज्य सरकारने रमजानाच्या दिवसांत होणारी अन्नाची नासाडी कमी करण्यासाठी विशेष उपक्रम राबविला आहे.
पहांग राज्याची राजधानी कुआंतन शहराच्या मध्यभागी असलेल्या पार्कमध्ये वाया जाणाऱ्या अन्नापासून खत निर्मिती करणारे मोबाईल मशिन बसविण्यात आले आहेत.
दररोज संध्याकाळी उपवास सोडल्यानंतर अनेक कुटूंब शिल्लक राहिलेले अन्न या मशिनमध्ये टाकतात.
अन्नाचे तुकडे मशिनमध्ये टाकल्यानंतर ४८ तासांपर्यंत तांदळाच्या भुशासोबत हळूहळू मिसळले जाते.
त्यानंतर त्यातून बाहेर पडणारे तपकीरी रंगाचे वेस्ट मटेरियल शेतकऱ्यांना पॅकिंग करून खत म्हणून वापरण्यासाठी देतात.