Aslam Abdul Shanedivan
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी सोमवारी (ता.८) आसाम आणि मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत
आसामला मुसळधार पावसाने झोडपले असून येथे २४ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे
तर आसाममध्ये पुरामुळे ७८ जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी आराम दौऱ्यावर असून त्यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली
राहुल गांधी यांनी आसाममधील सिलचर आणि कचार जिल्ह्यांनाही भेट देत पूरग्रस्तांची भेट घेतली.
यादरम्यान राहुल गांधी यांनी फुलेरताल येथील मणिपूर हिंसाचारग्रस्तांची भेट घेतली.
आसामचे फुलरताल हे मणिपूर सीमेला लागून असून हिंसाचारामुळे फुलरतालचे लोक प्रभावित झाली होती. सध्या येथील नागरीक मदत शिबिरांमध्ये राहत आहेत.
यादरम्यान आसाममधील काँग्रेस नेत्यांनी नुकसान भरपाईबाबत राहुल गांधी यांना निवेदन सादर केले.