Anuradha Vipat
मुळ्याची पाने शरीरासाठी अमृतासमान आहेत आणि अनेक लोक ती कचरा समजून फेकून देण्याची मोठी चूक करतात.
विज्ञानानुसार मुळ्याच्या कंदापेक्षा त्याच्या पानांमध्ये जास्त पोषक घटक, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात.
मुळ्याच्या पानात भरपूर प्रमाणात डायटरी फायबर असते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास दूर होऊन पोट साफ राहते.
यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण खूप जास्त असते. हे शरीराला संसर्गापासून वाचवते आणि इम्युनिटी बूस्ट करते.
मुळ्याच्या पानांमध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड मोठ्या प्रमाणात असते. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भरून निघते व थकवा कमी होतो.
या पानांमध्ये रक्तातील साखर नियंत्रित ठेवणारे घटक असतात. तसेच, यातील पोटॅशियम रक्तदाब नॉर्मल ठेवण्यास मदत करते.
आयुर्वेद आणि वैद्यकीय शास्त्रानुसार, मूळव्याधाचा त्रास असलेल्या रुग्णांनी मुळ्याच्या पानांचा रस किंवा त्याची भाजी खाल्ल्यास सूज आणि वेदना कमी होतात.