Mahesh Gaikwad
दरवर्षी जगभरात १० फेब्रूवारी हा दिवस 'जागतिक कडधान्य दिन' म्हणून साजरा केला जातो.
'जमीन आणि मानवाच्या पोषणासाठी कडधान्ये' हे यंदाच्या कडधान्य दिनाचे घोषवाक्य आहे.
मानवी आरोग्यासाठी कडधान्ये ही जीवनसत्त्वे आणि खनिजांचा चांगला स्त्रोत आहेत. याशिवाय मानवी पोषणासह शाश्वत शेतीसाठी कडधान्ये अतिशय महत्त्वाची आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या संशोधनानुसार प्रतिवर्षी प्रति व्यक्ती कमीत कमी १७ ते २५ किलो कडधान्यांचा आहारात समावेश असणे आवश्यक आहे.
मोड आलेली कडधान्ये पचायला सोपी असतात. त्यामध्ये जीवनसत्त्वांचे प्रमाणही वाढते. 'क' जीवनसत्त्व मोड आल्यावर तयार होते.
मानवी आहारात कडधान्ये हे वनस्पती आधारित प्रथिनांचा उत्कृष्ट स्त्रोत आहेत. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असते.
डाळींमध्ये तंतुमय घटकांचे प्रमाण अधिक असते, जे पचनास मदत करते. याशिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
अन्नसुरक्षेसाठी कडधान्य पिके महत्त्वाची आहेत. कडधान्ये ही सर्व आर्थिक स्तरातील लोकांना परवडणारी आहे. त्यामुळे लोकांची अन्नाची गरज भागविण्यात कडधान्यांचा प्रमुख वाटा आहे.