Team Agrowon
सातारा जिल्ह्याला वित्त आराखडा दिला आहे. या आराखडा जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
या आराखड्यानुसार कृषी, उद्योग यासह विविध संस्थांना वित्तपुरवठा करावा. रब्बी हंगामातील पीक कर्जासाठी दिलेले बँक शाखानिहाय उद्दिष्ट बँकांनी पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांन केल्या.
जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
या बैठकीत त्यांनी बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीस आरबीआयचे व्यवस्थापक विजय कोरडे,
जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, महाराष्ट्र बँकेचे उपअंचल प्रबंधक मिलिंद होळ, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक योगेश पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ यांच्यासह विविध बँकांचे व्यवस्थापक उपस्थित होते.