Team Agrowon
भारतामध्ये दर वर्षी २७ लाख लोकांना सर्पदंश होतो. ५० हजार लोकांचा मृत्यू होतो. सर्पदंशाचे बहुतांश रुग्ण गरीब तरुण शेतमजूर, महिला व मुले असतात.
पावसाळ्यात सर्पदंशाबाबत गाव व वाड्या वस्त्यांवर जनजागृती मोहीम राबविणे गरजेचे आहे.
योग्य उपाय आणि सावधगिरी बाळगल्यास सर्पदंश व त्यामुळे होणारे मृत्यू रोखता येऊ शकतात.
‘पावसाळा सुरू झाल्यामुळे शेतात काम करताना शक्यतो पायवाट सोडून जाऊ नये. गवतातून चालताना पायात बूट घालावेत.
उंच गवतात वावर असणाऱ्या व्यक्तींनी नडगी व पोटरी यांचे संरक्षण करू शकतील अशी आवरणे बांधणे आवश्यक आहे.
घरात जमिनीवर झोपणे टाळावे. झोपेच्या आधी अंथरूण तपासावे.
सर्पदंश झाल्यानंतर ताबडतोब रुग्णाला प्राथमिक उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात नेले पाहिजे. याबाबत जनजागृती हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे.