sandeep Shirguppe
जगभरात १२ जून हा बालकामगार विरोधी दिन म्हणून पाळला जातो. बालमजूरी नष्ट करण्यासाठी आज लोकांना जागरुक केले जाते.
जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवणे हा गुन्हा आहे.
देशात बालकांना बालमजुरीपासून रोखण्यासाठी कामगार कायदा १९८६ लागू करण्यात आला आहे.
या कायद्यानुसार,१४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नसलेल्या कोणत्याही कामात कामावर ठेवता येणार नाही.
तर 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना फिटनेस प्रमाणपत्र असेल तरच कारखान्यात वैगरे काम करता येते.
कलम २४ अन्वये, १४ वर्षांखालील मुलांना कोणत्याही कारखान्यात किंवा खाणीत काम करण्यास मनाई आहे.
अपंगत्व असेल तर त्यांना विशेष सुविधा, स्वच्छ पाणी, पोषक आहार, निरोगी राहण्यासाठी स्वच्छ वातावरण या सुविधाही मिळवण्याचा त्याला अधिकार आहे.
सर्व अनुदानित खाजगी शाळांमधील उपलब्ध जागांपैकी २५ टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांसाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे.