Aslam Abdul Shanedivan
गेल्या काही दिवसापासून मराठवाडा, विदर्भासह राज्यातील विविध जिल्ह्यात गारपीट आणि अतिवृष्टी होत आहे.
यामुळे आपत्तींमुळे द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला आणि इतर सर्वच पिकांचे नुकसान होत आहे.
या नुकसानीला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकल्या. तर काहींनी प्लॅस्टिक आच्छादनाचा (पॉलिहाउस- शेडनेट) वापर करून आपल्या फळगावा वाचवल्या आहेत
तसेच महाराष्ट्र द्राक्ष बागायदार संघाच्या नाशिक विभागानेही देखील राज्य सरकारकडे प्लॅस्टिक आच्छादनासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे
बागा फुलोऱ्यावर असताना अतिवृष्टीपासून बचाव होतो. तसेच फुलोरा धुऊन जाण्याचे प्रमाण कमी राहते. दर्जेदार फळधारणा होते.
आच्छादनाखाली भर पावसातही ‘पेस्टिंग’, डीगिंग, बगल फूट काढणी अशी हंगामी कामे करता येतात
फवारणी संख्या कमी होते. यामुळे खर्चात बचत होण्यासह बागेतील तापमानावर नियंत्रण राहते. तर साखर भरण्याच्या वेळी फळांना चांगली गोडी येते