Aslam Abdul Shanedivan
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी यांनी मंगळवारी १० नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला
सध्या देशात ४१ वंदे भारत एक्सप्रेस धावत असून २४ राज्ये आणि २५६ जिल्ह्यांध्ये वंदे भारतचे जाळे विस्तारले आहे.
दिल्ली-कटरा, दिल्ली-वाराणसी, मुंबई-अहमदाबाद, म्हैसूर-चेन्नई, कासारगोड-तिरुवनंतपुरम, विशाखापट्टणम-सिकंदराबाद या सहा मार्गांवर दोन वंदे भारत रेल्वे धावतील.
वंदे भारत गाड्या प्रामुख्याने विविध राज्यांमध्ये पसरलेल्या विद्युतीकृत ब्रॉडगेज नेटवर्कवर धावतात. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा अतिरिक्त वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन केले होते.
यामध्ये दिल्ली-कटरा जोडणाऱ्या दुसऱ्या ट्रेनचाही समावेश होता. तर अमृतसर ते दिल्ली, कोईम्बतूर ते बेंगळुरू, मंगळूर ते मडगाव, जालना ते मुंबई आणि अयोध्या ते दिल्ली यांचा समावेश आहे.
तर दिल्ली आणि वाराणसी दरम्यानच्या दुसऱ्या ट्रेनचेही डिसेंबर २०२३ मध्ये उद्घाटन करण्यात आले. सद्यस्थितीत सध्या फक्त दिल्लीत सर्वाधिक १० वंदे भारत गाड्या धावत आहेत.
'या' नवीन १० मार्गांवर वंदे भारत धावणार
मंगळवारी पंतप्रधान मोदींनी नव्या १० गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यात मुंबई-अहमदाबाद, विशाखापट्टणम-सिकंदराबाद, म्हैसूर-चेन्नई, पाटणा-लखनौ, न्यू-जलपाईगुडी-पटना, पुरी-विशाखापट्टणम, लखनौ-डेहराडून, कलबुर्गी-बेंगळुरू, रांची-वाराणसी, खजुराहो-डीला यांचा समावेश आहे.