Anuradha Vipat
गरोदरपणात महिलांच्या आहाराचा थेट परिणाम गर्भातील बाळाच्या आरोग्यावर होत असतो.
काही फळांमुळे गर्भपात किंवा अकाली प्रसूतीचा धोका वाढू शकतो.
कच्च्या पपईमध्ये 'लेटेक्स' आणि 'पेपेन' नावाचे घटक असतात. हे घटक गर्भाशयात आकुंचन निर्माण करतात, ज्यामुळे गर्भपाताचा धोका वाढतो.
अननसामध्ये 'ब्रोमेलेन' नावाचे एन्झाईम असते. हे एन्झाईम गर्भाशयाचे तोंड मऊ करते आणि अकाली प्रसूती किंवा गर्भपातास कारणीभूत ठरू शकते.
द्राक्षांच्या सालीमध्ये 'रेझवेराट्रोल'नावाचे संयुग असते. हे गरोदर महिलांमधील संप्रेरकांचे संतुलन बिघडू शकते.
खजूर अत्यंत पौष्टिक असले तरी त्यांची प्रवृत्ती उष्ण असते. जास्त प्रमाणात खजूर खाल्ल्याने गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये आकुंचन होऊ शकते.
गरोदरपणाच्या नऊ महिन्यांत महिलांनी आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.