Anuradha Vipat
विज्ञानानुसार ग्रहण ही एक खगोलीय घटना असली, तरी भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदामध्ये ग्रहणादरम्यान गर्भवती महिलांनी खबरदारी घेणे शुभ मानले जाते.
ग्रहणादरम्यान वातावरणात हानिकारक किरणांचा प्रभाव असतो त्यामुळे गर्भवती महिलांनी थेट सूर्यप्रकाश किंवा चंद्रप्रकाशाच्या संपर्कात येऊ नये
ग्रहणादरम्यान सुरी, कात्री, सुई किंवा विळी यांसारख्या धारदार वस्तूंचा वापर करू नये.
ग्रहणापूर्वी तयार केलेले अन्न ग्रहण संपल्यानंतर खाऊ नये.
पाणी किंवा साठवलेल्या अन्नामध्ये तुळशीची पाने टाकून ठेवावीत, जेणेकरून त्यातील शुद्धता टिकून राहते
ग्रहणाच्या काळात झोपण्याऐवजी देवाचे नामस्मरण करणे किंवा धार्मिक पुस्तके वाचणे उत्तम मानले जाते
बसताना किंवा झोपताना शरीर वाकवून न बसता ताठ बसण्याचा सल्ला दिला जातो