Anuradha Vipat
मूळव्याध आणि पचनाच्या जुनाट समस्यांवर वेळीच योग्य आहार आणि जीवनशैलीत बदल करणे हाच सर्वात मोठा आणि रामबाण उपाय आहे.
चुकीचा आहार, शरीरात पाण्याची कमतरता आणि मैद्याच्या पदार्थांमुळे होणारी बद्धकोष्टता हे मूळव्याध होण्याचे मुख्य कारण आहे.
ताक हे पचनासाठी सर्वोत्तम मानले जाते आणि ते आतड्यांना थंडावा देऊन मूळव्याधाची सूज कमी करते.
अंजीर हे नैसर्गिक रेचक म्हणून काम करते, ज्यामुळे जुनाट बद्धकोष्टता दूर होते.
शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास आतड्यांमधील मळ सुकतो आणि पाईल्सचा त्रास वाढतो.
सकाळी रिकाम्या पोटी २० मिली कोरफडीचा रस कोमट पाण्यातून घेतल्यास पचनसंस्थेचा दाह कमी होतो आणि मूळव्याधाच्या जखमा लवकर भरून येतात.
आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या , ओट्स आणि तृणधान्यांचा समावेश करा. फायबरमुळे मळ मऊ होतो आणि पोट साफ होण्यास मदत होते.