Anuradha Vipat
दुपारचे जेवण हे आपल्या शरीराला दिवसभर कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा देणारे मुख्य अन्न असते.
निरोगी आयुष्यासाठी दुपारच्या जेवणात केवळ पोट भरणे महत्त्वाचे नसून, प्रोटीन, फायबर, जीवनसत्त्वे आणि कार्बोहायड्रेट्सचा समावेश असलेली एक परिपूर्ण संतुलित थाळी असणे अत्यंत गरजेचे आहे.
थाळीत १ ते २ चपात्या असावी. सोबत थोडा ब्राउन राईस किंवा पांढरा भात चालेल. फक्त भात खाणे टाळावे.
स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि शरीराच्या पोषणासाठी प्रोटीन अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी दररोज एक वाटी वरण , मसूर, चणे, मूग किंवा छोले असावे.
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज एक हिरवी पालेभाजी किंवा फळभाजी थाळीत असावी.
पचनक्रिया सुलभ करण्यासाठी आणि गॅस-अपचनाचा त्रास टाळण्यासाठी जेवणात काकडी, गाजर, टोमॅटो, बीट आणि मुळा यांचे सॅलड नक्की ठेवावे.
दुपारच्या जेवणात एक वाटी फ्रेश दही किंवा जिरे-कोथिंबीर टाकलेले एक ग्लास ताक नक्की असावे. हे आतड्यांचे आरोग्य उत्तम राखते आणि जेवण पचण्यास मदत करते.