Mahesh Gaikwad
काही दिवसांतच पावसाळी हंगामाला सुरूवात होईल, अशावेळी पोल्ट्री व्यावसायिकांनी वेळेनुसार पोल्ट्री व्यवस्थापनात बदल करणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात वातावरणातील बदल आणि व्यवस्थापनातील त्रुटींमुळे कोंबड्यांना विविध आजार होण्याची शक्यता असते.
कोंबड्यांचे पिण्याचे पाणी गढूळ किंवा शेवाळयुक्त होते. अशा पाण्यात विविध जंतूंची वाढ होते. यामुळे कोंबड्यांना रोगांची लागण होण्याची शक्यता असते. परिणामी कोंबड्यांसाठी स्वच्छ आणि निर्जंतूक पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
पावसाळ्यात पोल्ट्रीशेडमध्ये माशांचा प्रादुर्भाव वाढतो. तसेच वातावरणामुळे शेडमधील वाढलेल्या अमोनियाचा कोंबड्यांच्या डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळे शेडची स्वच्छता ठेवावी.
पावसाची दिशा आणि वाऱ्याचा वेग याचा विचार करूनच पोल्ट्रीशेड पूर्व-पश्चिम बांधलेले असावे. याशिवाय शेडवरील पत्रा मजबूत असावा. जेणेकरून वादळी वाऱ्याने तो उडून जावू नये.
पोल्ट्रीशेडच्या सभोवतालचे वाढलेले गवत काढून टाकावे. तसेच शेडच्या आसपासच्या परिसराची स्वच्छता ठेवावी.
पावसाळ्यात पोल्ट्रीशेडमधील लिटर किंवा गादी दिवसातून किमान एकवेळा तरी खालीवर हलवून घ्यावी. लिटरमध्ये आर्द्रता राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
एक आठवडा पूरेल एवढ्याच खाद्याची साठवणूक करावी, जास्त दिवस खाद्य साठविल्यास त्यामध्ये बुरशी होण्याची शक्यता असते.