Swapnil Shinde
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते.
त्यामधील पीएम किसान सन्मान योजना सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे. त्यामध्ये कोट्यावधी शेतकरी लाभार्थी आहेत.
त्यात धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. त्यामध्येही शेतकऱ्यांना ६ हजार रुपये दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपये मिळतात.
त्याचबरोबर केंद्र सरकारने आता लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मासिक पेन्शनसाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PMKMY) आहे.
पीएम किसान मानधन योजनेंतर्गत केंद्र सरकार दरमहा शेतकऱ्यांना ३ हजार रुपये पेन्शन देते.
ज्यामध्ये शेतकर्यांना दरमहा ५५ ते २०० रुपये जमा करावे लागतात. ही एक ऐच्छिक आणि अंशदान आधारित पेन्शन योजना आहे