Anuradha Vipat
भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी पूजेमध्ये काही विशिष्ट पत्री आणि फुले अर्पण केली जातात.
बेलाचे पान शिवाला सर्वात जास्त प्रिय आहे. 'त्रिदल' बेलपत्र अर्पण केल्याने तिन्ही जन्मांची पापे नष्ट होतात.
धोत्र्याचे फूल आणि फळ शिवाला अर्पण केले जाते. हे वैराग्याचे प्रतीक मानले जाते.
रुईची पांढरी किंवा जांभळी फुले महादेवाला प्रिय आहेत.
सोमवारी किंवा महाशिवरात्रीला शमीची पाने अर्पण केल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धी मिळते.
भांग ही औषधी वनस्पती मानली जाते. समुद्रमंथनावेळी निघालेल्या विषाची जळजळ शांत करण्यासाठी देवांनी शिवाला भांग अर्पण केली होती
महादेवाला कधीही केवड्याचे फूल किंवा हळद अर्पण करू नये, कारण ते निषिद्ध मानले जाते.