Anuradha Vipat
मुळव्याध ही समस्या चुकीची जीवनशैली आणि आहारामुळे उद्भवते.
मुळव्याध ही समस्या सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर काही प्रभावी घरगुती उपायांनी ती नक्कीच नियंत्रणात येऊ शकते.
मुळव्याधीचे मुख्य कारण बद्धकोष्ठता आहे. दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्यायल्याने शौचास मऊ होते आणि वेदना कमी होतात.
आहारात हिरव्या पालेभाज्या, पपई, आणि तृणधान्यांचा समावेश करा. यामुळे पचन सुधारते.
एका टबात कोमट पाणी घेऊन त्यात १५-२० मिनिटे बसावे. यामुळे गुदद्वाराजवळील सूज आणि वेदना कमी होण्यास मोठी मदत होते
कोरफडीचा गर नैसर्गिक दाहशामक असतो. तो बाह्य भागावर लावल्यास खाज आणि आग कमी होते.
दुपारच्या जेवणानंतर ताकात चिमूटभर ओवा आणि काळं मीठ टाकून प्यायल्याने पचन सुधारते आणि मुळव्याधीचा त्रास कमी होतो