Anuradha Vipat
अँक्झायटी म्हणजे भविष्यातील अवाजवी चिंता आणि भीती म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीमुळे निर्माण होणारी अस्वस्थता होय.
जेव्हा तुमचे मन भीतीने खूप अस्वस्थ होईल, तेव्हा आजूबाजूला पहा आणि या ५ गोष्टी करा
४ सेकंद नाकाने खोल श्वास घ्या, ४ सेकंद श्वास रोखून धरा, ४ सेकंदात तो हळूहळू तोंडाने बाहेर सोडा आणि पुन्हा ४ सेकंद थांबून हीच प्रक्रिया पुन्हा करा.
मनात येणारे भीतीदायक विचार खरोखरच खरे आहेत की तो फक्त तुमच्या मनाचा भ्रम आहे, स्वतःला प्रश्न विचारा. ९०% भीती ही काल्पनिक असते.
चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्सचे अतिसेवन अँक्झायटी आणि शरीरातील थरथराट वाढवते.
दिवसभरात फक्त १० ते १५ मिनिटांचा वेळ चिंतेसाठी बाजूला ठेवा. इतर वेळी चिंताजनक विचार आल्यास "मी यावर 'चिंतेच्या वेळेतच' विचार करेन" असे मनाला सांगा.
रोज २० ते ३० मिनिटे वेगाने चालणे किंवा व्यायाम केल्याने शरीरातील ताण निर्माण करणारे 'कॉर्टिसॉल' संप्रेरक कमी होते