Aslam Abdul Shanedivan
क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रविवार (ता.१४) संयुक्त जयंती आहे.
या गुरु-शिष्याच्या जयंती निमित्त राज्याच्या काणाकोपऱ्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना भारतीय समाजसुधारक आणि आधूनिक भारताच्या समाजक्रांतीचे जनक म्हटले जाते. तर शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकातून त्यांनी देशातील शेतीप्रश्नांची धग मांडली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामवंत कृषिअर्थतज्ज्ञ होते. ‘शेती हे केवळ पोट भरण्याचे साधन नसून राष्ट्रीय उत्पादनाचे मोठे साधन आहे. शेतीकडे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून पाहू नये. आर्थिक विकासाचे साधन म्हणून शेतीला विशेष महत्त्व द्या’, असा आग्रह ते सतत धरत.
महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मोरेनगर ता. सटाणा येथील एका शेतकऱ्याने आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली आहे
मोरेनगर येथील किरण मोरे हे प्रयोगशील कांदा उत्पादक शेतकरी असून ते एक उत्तम व्यंगचित्रकार आहेत.
मोरे यांनी कांद्यावर महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा रेखाटून आदरांजली वाहिली आहे