Team Agrowon
आधीच दुष्काळाचे संकट आणि त्यातही कशीबशी पेरणी करून आलेल्या ज्वारी पीकाच्या काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
अशा विचित्र परिस्थितीत सध्या जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातला शेतकरी सापडला आहे.
यंदा मॉन्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. कमी पावसाअभावी रब्बीच्या पेरण्यांना उशीर झाला. दुष्काळी स्थिती असतानाच झालेल्या अवकाळी पाऊस झाला.
रानं मोकळी राहण्यापेक्षा शेतकऱ्यांनी ज्वारी पेरली. यातून काही उत्पन्न मिळेल शिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तरी भागेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती.
त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी केली. हंगाम संपल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाच्या जोरावर ज्वारी लावली.
आता ज्वारीचे पीक काढणीला आले आहे. मात्र, काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी चांगलाच हतबल झाल्याचे चित्र आहे.