Anuradha Vipat
भेंडी धुवल्यानंतर ती कापण्यापूर्वी कापडाने पुसून पूर्ण कोरडी करा.
भाजी शिजत असताना त्यात २ थेंब लिंबाचा रस, थोडे आमसूल किंवा चिंचेचा कोळ घाला.
भाजी पूर्ण शिजत आल्यावर सर्वात शेवटी मीठ घाला. सुरुवातीला मीठ घातल्यास भेंडीला पाणी सुटते आणि ती चिकट होते.
भेंडी शिजवताना कढईवर कधीही झाकण ठेवू नका. वाफेमुळे पाणी सुटून भाजी बुळबुळीत होते.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि भरपूर लसूण पाकळ्या ठेचून घाला.कापलेली भेंडी घालून मध्यम आचेवर ५-७ मिनिटे उघड्यावरच परता.
भेंडीचा चिकटपणा कमी झाला की त्यात हळद, तिखट आणि गरम मसाला घाला. भाजी कुरकुरीत हवी असल्यास १ चमचा बेसन पीठ किंवा दाण्याचा कूट वरून पेरा.
सर्वात शेवटी चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा.