sandeep Shirguppe
भारताने चीनला मागे टाकत जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून १ नंबर मिळवला आहे.
संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीकडून (यूएनएफपीए) एक अहवाल सादर करण्यात आला आहे.
अहवालानुसार, भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर पोहोचली आहे.
यामध्ये शून्य ते १४ वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण २४ टक्के असल्याचे म्हटले आहे.
पुढील ७७ वर्षांत भारताची लोकसंख्या दुप्पट होण्याची शक्यता वर्तविली आहे.
सध्या १.४४ अब्ज लोकसंख्येसह भारत जगात पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर चीनची लोकसंख्या १.४२५ अब्ज आहे.
भारतातील माता मृत्यूमध्ये लक्षणीय घट झाली आहे. ती जगातील सर्व मृत्यूंपैकी ८ टक्के आहे.
अल्पसंख्याक, एलजीबीटीक्यूआयए समूहातील लोक, एचआयव्हीग्रस्त, लैंगिक बाबतीत मोठ्या भेदभावाला सामोरे जावे लागते, असे अहवालात म्हटले आहे.