Anuradha Vipat
सकाळी उठल्याबरोबर पाणी न पिणे किंवा लगेच चहा-कॉफी पिणे ही ती एक मोठी चूक आहे ज्यामुळे तुमचे पोट सुटू शकते.
सकाळी पाणी न प्यायल्याने चयापचय क्रिया संथ होते, ज्यामुळे कॅलरीज जळण्याचे प्रमाण कमी होते.
सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. ही प्रक्रिया न झाल्यास शरीरात सूज आणि चरबी वाढते.
पाणी कमी प्यायल्याने पोट साफ होत नाही. साचलेल्या कचऱ्यामुळे पोट फुगलेले दिसते आणि पोटाचा घेरा वाढतो.
सकाळी पाणी न पिता थेट नाश्ता केल्याने जास्त भूक लागते.
चहा-कॉफीमधील कॅफिनमुळे स्ट्रेस हार्मोन वाढू शकतो, जो पोटाच्या भागातील चरबी साठवण्यासाठी कारणीभूत ठरतो
सकाळी उठल्याबरोबर किमान १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे पचनसंस्था सक्रिय होते