Anuradha Vipat
पावसाळ्यात अचानक बदलणारे हवामान मायग्रेन असलेल्या रुग्णांसाठी सर्वात मोठे ट्रिगर ठरते.
या ऋतूत थंड हवा, ढगाळ वातावरण आणि हवेतील दाब यामुळे डोकेदुखीचा त्रास तीव्र होतो.
पावसाळ्यातील दमट हवामानामुळे शरीरात डिहायड्रेशन वेगाने होते, जे डोकेदुखीचे मुख्य कारण आहे.
दमट वातावरणामुळे घरात बुरशी आणि हवेत परागकण वाढतात. या ॲलर्जीमुळे सायनसवर ताण येऊन मायग्रेन ट्रिगर होतो.
पावसाळ्यात अंधुक किंवा ढगाळ वातावरणामुळे शरीरातील 'मेलाटोनिन' हार्मोनचे संतुलन बिघडते, ज्यामुळे झोप नीट होत नाही .
उपाशी राहिल्याने किंवा जेवणाची वेळ चुकल्याने मायग्रेनचा त्रास लगेच वाढतो.
पावसाळ्यात जास्त चहा, कॉफी, चॉकलेट, आंबवलेले पदार्थ (इडली, डोसा) आणि शिळे अन्न खाणे टाळा.