Anuradha Vipat
पावसाळ्यात पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असले, तरी या दिवसांत त्यांच्यावर बॅक्टेरिया आणि कीटकांचा प्रादुर्भाव जास्त असतो.
पावसाळ्यात पालेभाज्या खाताना विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून पोटाचे विकार टाळता येतील.
पालेभाज्या धुताना मीठ किंवा पांढरे विनेगर टाका. या पाण्यात भाज्या १० ते १५ मिनिटे भिजवून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने ३-४ वेळा धुवून घ्या.
पावसाळ्यात पालेभाज्या कधीही कच्च्या खाऊ नका. कच्च्या पालेभाज्यांमुळे फूड पॉयझनिंग, टायफॉइड किंवा डायरिया होण्याचा धोका सर्वाधिक असतो.
पालेभाज्या नेहमी चांगल्या शिजवून किंवा उकळत्या पाण्यात वाफवून घ्याव्यात.
भाजी निवडताना प्रत्येक पान नीट तपासा. काळी पडलेली, सडलेली किंवा छिद्र असलेली पाने फेकून द्या आणि फक्त ताजी पानेच वापरा.
पावसाळ्यात पालेभाज्यांची भाजी ताजी असतानाच खावी. शिजवलेली भाजी जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवून पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्यातील पोषक घटक नष्ट होतात.