Anuradha Vipat
पावसाळा हा आनंददायी ऋतू असला तरी या काळात सर्दी, खोकला, ताप, पचनाचे विकार आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो.
पावसाळ्यात नेहमी ताजे आणि गरम अन्न खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे अन्नातील जंतू नष्ट होण्यास मदत होते.
हळद व आल्यामध्ये दाहशामक आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात.
लसूण रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतो आणि संसर्गाचा धोका कमी करतो.
सफरचंद, डाळिंब, नाशपती आणि पेरू यांसारखी फळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरवतात.
गरम सूप आणि हर्बल काढा शरीर उबदार ठेवण्यास मदत करतात आणि घशाला आराम देतात.
मूग, मसूर, हरभरा आणि इतर कडधान्ये प्रोटीनचा चांगला स्रोत आहेत.