Swarali Pawar
कमी पाऊस आणि खतटंचाईच्या शक्यतेमुळे भरडधान्ये उत्तम पर्याय ठरू शकतात. ही पिके कमी खर्चात आणि प्रतिकूल हवामानातही चांगले उत्पादन देतात.
भरडधान्यांना भात, ऊस किंवा कापसाच्या तुलनेत खूप कमी पाणी लागते. म्हणूनच कोरडवाहू भागासाठी ही पिके अधिक उपयुक्त ठरतात.
बाजरी, नाचणी आणि इतर भरडधान्यांमध्ये फायबर, प्रथिने आणि खनिजे मुबलक असतात. आरोग्याबाबत वाढलेल्या जागरूकतेमुळे त्यांची मागणी वाढत आहे.
या पिकांना कमी प्रमाणात रासायनिक खते आणि औषधांची गरज भासते. कीड-रोगांचा प्रादुर्भावही तुलनेने कमी असल्याने खर्च वाचतो.
मुरमाड आणि हलक्या जमिनीत बाजरी, नाचणी आणि वरई उत्तम येतात. कमी पावसातही ही पिके चांगली तग धरून राहतात.
मध्यम निचऱ्याच्या जमिनीत खरीप ज्वारी, राजगिरा आणि कोदरा चांगले उत्पादन देतात. नाचणीची वाढ आणि दाण्यांची गुणवत्ता देखील सुधारते.
भरडधान्यांना आता 'सुपरफूड' म्हणून ओळख मिळत आहे. त्यामुळे बाजारात या पिकांना चांगला दर मिळण्याची शक्यता वाढली आहे.
सॉर्टिंग, ग्रेडिंग आणि पॅकेजिंग करून स्वतःचा ब्रँड तयार करा. योग्य बाजारपेठ मिळाल्यास भरडधान्य शेती अधिक फायदेशीर ठरू शकते.