Aslam Abdul Shanedivan
सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून अनेकांना कामानिमित्त बाहेर पडावे लागते. यामुळे अनेक समस्या उद्भवतात
यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून लोक पाण्याची बाटली बाळगत आहेत. तर उष्माघाताच्या त्रासापासून वाचण्यासाठी गॉगल, टोपी वापरत आहेत
तसेच उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून पाण्यासह फळांच्या सेवणावर भर दिला जात आहे
तर सध्या वाढत्या उन्हात भरपूर पाणी असणारे फळ खाणे फायद्याचे ठरते. सध्या खरबूज कमी खर्चात उपलब्ध होत असून यातील गुणधर्म शरीर हायड्रेट ठेवतात.
खरबूजमध्ये व्हिटॅमिन ए, सी, प्रोटीन, पोटॅशियम, फोलेटसह फायबर, बीटा-कॅरोटीन, कार्बोहायड्रेट्स, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात
खरबूजाचे सेवन केल्यास मोतीबिंदूची समस्या कमी होण्यासह हृदय निरोगी राहते.
उन्हाळ्यात पचनक्रिया निरोगी राहण्यासाठी खरबूज फार लाभदायक ठरते. यामुळे बद्धकोष्ठता होत नाही.