Team Agrowon
प्रत्येक उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होते, जमिनीवर क्षार तसेच राहतात आणि जमिनी क्षारयुक्त बनते. या जमिनी सुधारण्याच्या उद्देशाने सामूहिक उपाययोजना राबवणे आवश्यक आहे.
काळ्या आणि गाळयुक्त माती असलेल्या बागायती क्षेत्रांमध्ये विरघळणारे क्षार आणि अदलाबदल करण्यायोग्य सोडियम पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे या जमिनी क्षारपड झाल्या आहेत.
जमिनी क्षारपड किंवा चोपण होवू नयेत, यासाठी काय काळजी घ्यावी हे आपण पाहूयात.
जमिनी सपाट असाव्यात, बांधबंदिस्ती करावी. पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
जमिनीतून पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी योग्य अंतरावर चर काढावेत. जमिनीतून पाण्याची पातळी दोन मीटरच्या खाली ठेवावी.
जमिन असलेल्या भागातून कालवा वाहत असल्यास त्यामधून पाणी झिरपू देवू नये.
जमिनीमध्ये सेंद्रीय पदार्थ व हिरवळीचे खत वापरून मातीची घडण ठेवावी. त्यामुळे हवा खेळती राहते. जागा पाण्याचा निचरा होण्यास मदत होते.