Team Agrowon
सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून उष्णतेच्या लाटा आहेत. तीव्र सूर्यप्रकाश व वाढलेल्या तापमानामुळे आंबे बहरातील फळांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
वाढलेले तापमान, पाणी कमतरतेमुळे पेरु बागेत फूलगळ, फळगळ दिसून येते.
झाडावरील काळी पडलेली, वाळलेली फळे काढून तसेच झाडाखाली गळून पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.
जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा.
बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी केओलिन ८ टक्के द्रावणाची फवारणी करावी.
दुष्काळी परिस्थितीत झाडे तग धरून राहण्यासाठी १ टक्के पोटॅशिअमची फवारणी करावी. तसेच हलकी छाटणी करून झाडाचा आकार मर्यादित ठेवावा.
सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. शक्यतो सकाळी पाणी द्यावे. फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रति हेक्टरी १० कामगंध सापळे लावावेत.