sandeep Shirguppe
आहारतज्ज्ञ आपल्याला नेहमी भिजवून बदाम खाल्ल्यास अनेक फायदे होतील असे सांगतात, बदामबरोबर काजूही भिजवून खाल्ल्यास अनेक फायदे होतात.
एका दिवसात १५ ते १८ काजू तुम्ही खाऊ शकता. काजू तुमच्या हृदयाचे कार्य सुरळीत राखण्यात मदत करते.
एका अभ्यासात असेही दिसून आले आहे की, जे लोक नियमित काजूचे सेवन करतात. त्यांच्यामध्ये खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते.
काजूत पॉलीफेनॉल आणि कॅरोटीनोइड्स सारखे अँटीऑक्सिडंट असतात याने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
बदामासारख्या ड्रायफ्रुट्सप्रमाणे काजू भिजवून खाणे देखील फायदेशीर मानले जाते.
भिजवलेल्या काजूमध्ये सुक्या काजूपेक्षा जास्त फायबर असते, जे आपल्या पचनसंस्थेसाठी फायदेशीर असते.
भिजवलेले काजूमुळे कॅल्शियम, लोह, फायबर आणि मॅग्नेशियम सारखी पोषक तत्वे मिळतात.
हाडे मजबूत ठेवण्यासोबतच ऑस्टियोपोरोसिस सारख्या हाडांशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो.
भिजवून काजू खाल्ल्याने आपल्या शरीरात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे पोषक तत्वे वाढतात.