Mahesh Gaikwad
भारतात मोठ्या प्रमाणात शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय करतात. शेतील पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाकडे अनेक शेतकऱ्यांचा ओढा असतो.
पशुपालन व्यवसायामध्ये दूध उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात दुभत्या जनावरांचे संगोपन शेतकरी करतात.
सध्या देशात मॉन्सूनचा हंगाम सुरू झाला आहे. देशात सर्वदूर माॉन्सूनच्या पावसाचे आगमन झाले आहे.
अशामध्ये पावसाळ्यात जनावरांच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असते. अन्यथा जनावरांना रोग आणि आजारांचा धोका होवू शकतो.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जनावरांचा गोठा किंवा त्यांना बांधण्याची जागा स्वच्छ व कोरडी राहिल याची काळजी घ्यावी. याठिकाणी पाणी साठू देवू नये.
याशिवाय पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांच्या आहार व्यवस्थापनाकडेही योग्य लक्ष देणे गरजेचे असते. जनावरांना कोरडा आणि पौष्टीक चारा द्यावा.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जनावरांची पचनक्रिया मंदावते आणि तसेच रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते. या दिवसांत जनावरांना बाह्य आणि आंतरपरजीवींच्या संसर्गाचा धोका असतो.
जनावरांना संसर्गापासून वाचविण्यासाठी पावळ्यात जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे अतिशय आवश्यक आहे.