Swarali Pawar
पाऊस, गारपीट किंवा छाटणीनंतर झाडांना जखमा होतात. यावर वेळीच बोर्डो पेस्ट लावल्यास झाडांचे संरक्षण करता येते.
बोर्डो पेस्ट बुरशी आणि जिवाणूंना रोखण्याचं काम करते. जखमांवर संरक्षक थर तयार होऊन रोगांचा प्रसार थांबतो.
मोरचूद पावडर, कळीचा चुना, पाणी, प्लास्टिक बादल्या लागतात. तसंच ब्रश आणि लाकडी काठीही तयार ठेवा.
१ किलो मोरचूद ५ लिटर पाण्यात आणि १ किलो चुना ५ लिटर पाण्यात विरघळवा. दोन्ही द्रावण एकत्र करून नीट ढवळा, पेस्ट तयार होईल.
तयार पेस्ट झाडाच्या बुंध्याला ब्रशने लावा. जमिनीपासून १ मीटर उंचीपर्यंत लावणं योग्य ठरतं.
पावसाच्या आधी आणि पावसाळ्यानंतर वर्षातून दोन वेळा लावा. छाटणीनंतर लगेच लावल्यास अधिक फायदा होतो.
लोखंडी भांड्यात पेस्ट बनवू नका, त्यामुळे रासायनिक प्रतिक्रिया होते. जास्त किंवा खूप पातळ पेस्ट लावल्यास झाडाला नुकसान होऊ शकतं.
फवारणीसाठी बोर्डो मिक्सचर वापरता येतं, जे पानांचे संरक्षण करते. यामुळे बुरशीजन्य रोग कमी होऊन उत्पादन टिकून राहतं.