Anuradha Vipat
मकर संक्रांतीच्या काळात ५ वर्षांखालील लहान मुलांचे 'बोरन्हाण' करण्याची जुनी परंपरा आहे.
मकर संक्रांतीला बोरन्हाण करणे या परंपरेमागे धार्मिक, शास्त्रीय आणि सामाजिक अशी महत्त्वाची कारणे आहेत.
बोरन्हाण करताना मुलाला नटवून समोर बसवले जाते आणि त्याच्या डोक्यावरून फळे-चॉकलेट्स ओतली जातात.
अशी धार्मिक मान्यता आहे की, लहान मुलांना कोणाची नजर लागू नये किंवा त्यांच्यावरील इडा-पीडा टळावी, यासाठी बोरन्हाण केल जाते.
लहान मुलांचे बोरन्हाण केल्याने बाळाच्या आयुष्यात सुख-समृद्धी येते अशी श्रद्धा आहे.
बाळाच्या जन्मानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला हे बोरन्हाण केले जाते याला एक महत्त्वाचा शिशुसंस्कार मानले जाते.
बाळाला नवीन ऋतूच्या बदलाची बाधा होऊ नये, त्याला उत्तम आरोग्य मिळावे आणि समृद्धी व सौभाग्य लाभावी यासाठीही बोरन्हाण केले जाते.य