Anuradha Vipat
वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य दाराला अतिशय महत्त्व आहे, कारण याच दारातून घरात सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचा प्रवेश होतो.
मुख्य दारावर काही विशेष शुभ चिन्हे लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते, समृद्धी वाढते आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते.
लाल किंवा सिंदूर रंगाचे स्वस्तिक लावल्याने विघ्न दूर होतात.
हे विश्वाची निर्मिती करणारे पवित्र चिन्ह असून, मुख्य दारावर लावल्याने घरातील कौटुंबिक कलह कमी होतात.
मुख्य दारावर कलशाचे चित्र किंवा चिन्ह लावल्याने घरात सुख-समृद्धी स्थिर राहते.
दाराच्या आत येणाऱ्या दिशेने लक्ष्मीची पावले लावल्याने धनधान्याची कमतरता भासत नाही.
आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे तोरण लावल्याने नकारात्मक ऊर्जा दारातच रोखली जाते.