Anuradha Vipat
विवाह कार्यात सतत अडथळे येत असतील तर महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर केलेले हे उपाय अत्यंत फलदायी मानले जातात.
भगवान शिव आणि माता पार्वती हे सुखी वैवाहिक जीवनाचे प्रतीक असल्याने त्यांच्या कृपेने विवाहाचे मार्ग मोकळे होतात.
महाशिवरात्रीला शिवलिंगावर केशरमिश्रित दुधाने अभिषेक करावा.
स्नानाच्या पाण्यात थोडे अत्तर किंवा सुगंधी द्रव्य घालून स्नान करावे आणि त्यानंतर शिवपूजन करावे.
केवळ शिवाची पूजा न करता, माता पार्वतीला सोळा शृंगार (बांगड्या, कुंकू, साडी, मेहंदी इ.) अर्पण करा.
१०८ बेलपत्रे घ्या. प्रत्येक बेलपत्रावर पिवळ्या चंदनाने 'ॐ नमः शिवाय' लिहा. ही पाने अर्पण करताना "ॐ गौरी शंकराय नमः" या मंत्राचा जप करा.
ज्या मुलींचे लग्न ठरण्यात अडचणी येत आहेत, त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांची एकत्र पूजा करावी.