Anuradha Vipat
महाराष्ट्रात पुरणपोळीच्या बेतासोबत झणझणीत आणि चमचमीत कटाची आमटी बनवणे ही एक परंपरा आहे.
पुरणपोळीसाठी चणा डाळ शिजवल्यानंतर जे उरलेले पाणी असते, त्याला 'कट' म्हणतात. याच कटापासून ही चवदार आमटी बनवली जाते.
कटाचे पाणी, सुके खोबरे , कांदा, खसखस, लसुण पाकळ्या, आले, कोथिंबीर, तेल, मोहरी, जिरे, कढीपत्त्याची पाने, हिंग,चमचा हळद, कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला , धणे पूड, चवीनुसार मीठ, थोडा गूळ.
भाजलेला कांदा, खोबरे, खसखस, आले, लसूण आणि कोथिंबीर थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्या.
२-३ चमचे तेल गरम करा . त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी द्या. यात तयार केलेले वाटण टाका. मसाला मंद आचेवर चांगला परतून घ्या. मसाला परतल्यावर त्यात हळद, धणे पूड आणि कांदा-लसूण मसाला घालून १ मिनिट परता.
मसाल्याला तेल सुटले की, त्यात चणा डाळीचे पाणी ओता. आवडीनुसार आमटी पातळ किंवा घट्ट ठेवण्यासाठी थोडे कोमट पाणी वाढवू शकता.
आमटीमध्ये चवीनुसार मीठ आणि छोटा खडा गूळ टाका. आमटीला मध्यम आचेवर छान १० ते १२ मिनिटे उकळू द्या. शेवटी वरून बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर भुरभुरा. तुमची गरमागरम, झणझणीत आणि खमंग महाराष्ट्रीयन कटाची आमटी तयार आहे!