Mahesh Gaikwad
राज्यासह देशातील ऊस गाळप हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. देशात फेब्रूवारीअखेर २५४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
देशातील आतापर्यंतच्या एकूण साखर उत्पादनापैकी ९० लाख टनांसह महाराष्ट्राने साखर उत्पादनात निर्विवाद आघाडी घेतली आहे.
साखर उत्पादनात महाराष्ट्राशी स्पर्धा असेलल्या उत्तर प्रदेश ७९ लाख टन साखर उत्पादनासह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
देशात गाळप हंगाम संपण्याचा वेग गेल्या वर्षीच्या तुलनेत मंदावला असून यंदा ७१ कारखान्यांचे गाळप संपले आहे. गेल्यावर्षी याच कालावधित सुमारे ९३ कारखाने बंद झाले होते.
चालू हंगामात महाराष्ट्रातील १३ कारखाने बंद झाले असून गेल्या वर्षी याच कालावधित तब्बल ५८ कारखाने बंद झाले आहेत.
सध्याची साखर उत्पादनाची स्थिती पाहता देशाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक राहण्याची शक्यता नाकरता येत नाही.
देशात सध्या ५९९ पैकी ४६२ साखर कारखान्यांमध्ये सध्या ऊस गाळप हंगाम सुरू असून २५५९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.