Anuradha Vipat
माघ पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा केल्याने 'धन-धान्य' आणि 'सुख-समृद्धी' प्राप्त होते.
सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करावे. चौरंगावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा.
हातात अक्षता आणि पाणी घेऊन "आज मी माझ्या घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि सुख-शांतीसाठी तुमची पूजा करत आहे," असा संकल्प करावा.
मूर्तीला दूध आणि शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. विष्णूंना पिवळ्या चंदनाचा आणि लक्ष्मीला कुंकवाचा टिळा लावावा. पिवळी फुले आणि कमळ किंवा लाल गुलाबअर्पण करावा.
दुधाची खीर किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्यात तुळशीचे पान नक्की ठेवावे.
आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी पूजेदरम्यान ॐ नमो भगवते वासुदेवाय आणि ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः मंत्रांचा किमान १०८ वेळा जप करावा
तुपाचा दिवा लावून विष्णू आणि लक्ष्मीची आरती करावी. पूजा संपल्यानंतर सायंकाळी मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दिवे लावावेत आणि तुळशीजवळही दिवा लावावा.