Anuradha Vipat
आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून जीवन जगण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे.
आयुर्वेदात नियमित दिनचर्येला विशेष महत्त्व दिले आहे. सकाळी लवकर उठणे, वेळेवर जेवणे आणि वेळेवर झोपणे.
आयुर्वेदानुसार ताजे, पौष्टिक आणि ऋतूनुसार उपलब्ध अन्न सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
आयुर्वेदात चांगली पचनशक्ती ही उत्तम आरोग्याचा पाया मानली जाते.
नियमित योगासने, प्राणायाम आणि व्यायाम केल्याने शरीर लवचिक राहते, रक्ताभिसरण सुधारते.
तणाव, राग आणि चिंता यांचा शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
आवळा, तुळस, अश्वगंधा, गुळवेल यांसारख्या आयुर्वेदिक वनस्पती आरोग्याला आधार देण्यासाठी उपयुक्त मानल्या जातात.