Anuradha Vipat
पूर्वीचे लोक १०० वर्षांपर्यंत जगण्यामागे विज्ञानाने सिद्ध केलेली काही जीवनशैलीची रहस्ये होती.
त्याकाळी खते किंवा कीटकनाशकांचा वापर नगण्य होता. शेतातील ताज्या भाज्या, हाताने सडलेला तांदूळ आणि भरड धान्य त्यांच्या आहारात असे .
'सूर्यास्तापूर्वी जेवण' हा त्यांचा नियम होता, ज्यामुळे पचन संस्था उत्तम राहायची
पाणी भरणे, दळण दळणे, शेती करणे किंवा मैलोन्मैल चालणे ही त्यांची रोजची कामे होती. यामुळे त्यांचे हृदय आणि फुफ्फुसे नैसर्गिकरित्या मजबूत राहत असत.
शुद्ध हवा आणि पाण्याचे स्त्रोत प्रदूषणापासून मुक्त होते.
औद्योगिक धूर आणि वाहनांच्या धुराचा अभाव असल्यामुळे श्वसनाचे विकार त्यांना कमी होत असत
त्याकाळी 'स्क्रीन टाइम' नव्हता. लोक एकमेकांशी संवाद साधायचे.