Anuradha Vipat
पोषक तत्वांची कमतरता, स्नायूंचा ताण, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होणे आणि सायटिका किंवा व्हेरिकोज व्हेन्स सारख्या नसांच्या समस्या ही पायदुखीची मुख्य कारणे आहेत.
कॅल्शियम कमी असल्यामुळे हाडे कमकुवत होतात, ज्यामुळे पायात सतत संथ वेदना जाणवते.
जास्त चालणे, धावणे, व्यायाम किंवा जड काम केल्यामुळे पायाच्या स्नायूंवर ताण येतो.
शरीरात पाणी आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम सारख्या खनिजांची कमतरता झाल्यास रात्रीच्या वेळी पायाच्या पोटऱ्यांमध्ये कडक गोळे येतात.
धमन्या आकुंचन पावल्यामुळे पायांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही, ज्यामुळे विशेषतः चालताना पाय भरून येतात.
वाढत्या वयानुसार गुडघे किंवा घोट्यांच्या सांध्यातील कूर्चा झिजल्यामुळे सांधेदुखी आणि पायदुखी सुरू होते.
शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यास पायाच्या अंगठ्यामध्ये आणि सांध्यांमध्ये तीव्र वेदना व सूज येते.