Team Agrowon
सुर्यफूल हे पीक प्रकाश असंवेदनशील असल्यामुळे तीनही हंगामात घेतले जाते.
पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीत लागवड करावी.
पिकाचे मूळ ६० सें.मी.पर्यंत खोलवर जात असल्यामुळे २० ते ३० सें.मी. खोलवर पहिली नांगरट करावी. दुसरी नांगरट उथळ करावी. त्यानंतर २ ते ३ कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.
सुधारित जाती - ८ ते १० किलो प्रतिहेक्टरी, संकरित जाती - ५ ते ६ किलो प्रतिहेक्टरी
दोन चाड्याच्या पाभरीने पेरणी करावी. त्यामुळे रासायनिक खते व बी एकाच वेळी पेरता येतात.
पेरणीनंतर १० ते १५ दिवसांनी विरळणी करावी.विरळणी केलेल्या क्षेत्रामध्ये बिगर विरळणी क्षेत्रापेक्षा १८ ते २३ टक्के अधिक उत्पादन मिळते.
हे पीक परपरागसिंिचत आहे. परागकण जड असल्यामुळे वाऱ्यापासून परपरागीकरण अतिशय कमी प्रमाणात होते. नैसर्गिक मधमाश्या कमी आढळल्यास कृत्रिमरीत्या परागीकरण घडवून आणल्यास उत्पादनात २० ते ४० टक्के वाढ होते.