Mahesh Gaikwad
भारतीय घरांमध्ये विशेषत: महाराष्ट्रातील घरात सकाळी-सकाळी नाश्त्यामध्ये खायला दिला जाणारा पदार्थ म्हणजे पोहे.
एवढंच नाही तर आयुष्याचा जोडीदाराची पहिली नजरभेटही होते ती अॅरेंज मॅरेजमधील कांदे पोह्याच्या कार्यक्रमातच.
कांदे पोह्याची महती ही आपल्याला एवढीच माहित असेल, पण नाश्त्यामध्ये पोहे खाण्याचेही अनेक फायदे आहेत.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतो. पण काही असे पदार्थ आहेत, जे खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराच्या गरजा पूर्ण होतात.
पोहे हाही असाच एक पदार्थ आहे. पोहे खायला तर स्वादिष्ट असतातच शिवाय ते बनवायला वेळही जास्त लागत नाही.
पोहे खाल्ल्याने तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पोह्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात, ज्यामुळे बद्धकोष्टतेचा त्रास होत नाही.
नाश्त्यामध्ये पोहे खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरही नियंत्रणात राहते. याशिवाय पोहे मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे.
पोह्यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे पोहे नाश्त्यामध्ये खाल्लास दिवसभर उर्जा मिळते.
पोह्यामध्ये फॅट आणि कॅलरी यांचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.